आज जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना समर्पित सर्वपक्षीय शोकसभा आणि श्रद्धांजली कार्यक्रमास उपस्थित राहिलो.

यावेळी दादांच्या आठवणींना उजाळा देताना मन जड झाले.
या शोकसभेस प्रशासकीय अधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा अस्त झाला असून, कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.पत्रकारांचे प्रश्न समजून घेणारा संवेदनशील नेता आपण गमावला आहे.